Friday, June 25, 2010

शिवाजी महाराज्यांची वंशावळ




महाराजांचा वंश गागाभट्टानी जो सिदध केला.तो प्रभु श्री रामाचा इश्वाकु वंशाचेसिसोदीया घराणे जेव्हा चितॊड कोसळले,त्यावेळी ज्या दोन रजपुत शाखा होती त्यातील एक महाराष्ट्रात आली ते म्हणजे पुढे भोसले.हे गागाभट्टानी मांडुन दाखवले.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला जी अनुकूल परिस्थिती मिळाली तिची सुरवात त्यांचा अजोबा मालोजी यांच्याच कर्तबगारीने होतो.शिवाजीचे पणजा बाबाजी यांचीदेखील इतिहासात प्रथम ओळ्ख होते ती मालोजीबरोबर त्यांच्या घृष्णेश्वर येथील शिलालेखाने.हे घराणे दॊलताबाद वेरुळच्या बाजुने नशीब काढण्यासाठी अहमदनगरच्या दक्षिणेला दॊंड जवळ पांडे-वडगाव या ठिकाणी आले.हे गाव अदिलशहा व निजामशहा यांच्या सरहद्दीवर असल्याने तेथील जहागिरी संभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते.त्याच्या पराक्रमाला जोड मिळाली ती फ़लटणच्या निंबाळ्काराचे चालुन आलेले स्थळ.मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली.त्यांची नावे शहाजी व शरीफ़जी ठेवण्यात आले.पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळ्त असत.पण घरातील विरोधामुळे त्यांनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले.मालोजी पुन्हा वेरुळला येऊन शेती करु लागले.तेथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापड्ला.त्या पॆशांच्या उपयोग करुन मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फ़ॊज तयार करुन सरदार बनले.निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले.व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजीना देऊन सोयरीक जमवली।भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीराचा जीर्णोध्दार करुन मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते अभिषेक करण्यात आले मंदीरच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो.

मालोजीनी सातारातील श्रीशिखरशिंगणापुरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधुन त्याने तलाव तयार केला ,यात्रेकरुचा दुवा मिळवला.निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’असे भोसले घराण्याच्या नावे दोन पेठा वसवल्या.मालोजीचा पराक्रम वाढतच गेला.आपल्या उपयुक्त कामगिरीने मालोजीनी बुह्राणपुरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहदवरील इंदापुरच्या बाजुच्या शत्रुचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवले.या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवुन रणक्षेत्रावर मरण पावले.भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरुपाने इंदापुरभुमीवर स्थापन झाले.जरी मालोजीचा अंत झाला तरी भोसले घराण्याच्या पराक्र्माची सुरवात केले.व शिवाजींना स्वराज्य स्थापण्यासाठी मोठी प्रेरणा दिली.

No comments:

Post a Comment