Sunday, July 4, 2010

कान्होजी आंग्रे



कान्होजी आंग्रे ह्यांचा जन्म पुणे जिल्ह्यातील खेडजवळील कालोसे गावी १६६९ मध्ये झाला . तुकोजी संकपाळ व विमाबाई चा हा मुलगा राजगुरुनगर येथे जन्मला. नवसाने आणि अंगारा धुपर्याने जन्मला म्हणुन आडनाव आंग्रे लाविले. त्यांनी ३ लग्ने केली. पाहिली पत्नी राजूबाई ( मथुराबाईकडून) त्यांना सेखोजी आणि संभाजी उर्फ़ आबासाहेब अशी २ मुले झाली. सेखोजी हे नाव त्यांच्या आजोबांच्यानाव वरुन ठेवले गेले. दूसरी पत्नी राधाबाई / लक्ष्मीबाई कडून त्यांना मानाजी आणि तुळाजी असे २ पुत्र झाले. तर तिसरी पत्नी गहिणबाई कडून त्यांना येसाजी व धोंडजी असे २ पुत्र झाले. या शिवाय शेवटी एक मुलगीझाल्याने तिचे नाव 'लाडूबाई' ठेवले गेले.


छत्रपति शिवाजी महाराजांच्या काळात कान्होजी सुवर्णदुर्ग येथे चाकरीला होते. १६८८ मध्ये सुवर्णदुर्गचाकिल्लेदार अचलोजी मोहिते पैसे घेउन फितुरीने किल्ला सिद्दीकड़े सोपवणार असे कळल्यावर कान्होजी यांनीसिद्दीविरुद्ध किल्ला लढवला आणि पराक्रम केला. पुढे १६९८ मध्ये सरखेल सिधोजी गुजर गेल्यानंतर राजाराममहाराजांनी कान्होजी अंग्रे यांना सरखेल (आरमाराचा सरसेनापती) पद सोपवले. ते त्यांच्या मृत्यूपर्यंतत्यांसकडेच होते. मराठा - मुघल युद्धामध्ये कोकणपट्टी सांभाळण्याचे कार्य कान्होजी आंग्रे यांनी पार पाडले. पोर्तुगीज, इंग्रज आणि सिद्दी यांना त्यांनी चांगलेच जेरिस आणले आणि संपूर्ण भागात आपला वचकप्रस्थापित केला.कान्होजी पुढे समुद्रावरचा शिवाजी म्हणून ओळखले जाऊ लागलेकान्होजींनी अलिबागचा कुलाबा किल्ला जिंकून घेऊन आपली राजधानी तेथे थाटली. छत्रपती राजारामांनीआंग्रे यांना आरमाराचा प्रमुख केले आणि आंग्रे कोकण किनार्याचे राजे झाले.


इ.स. १७०० मध्ये राणीताराबाईंनीही ह्या पराक्रमी वीराला सन्मानित करून सावंतवाडी ते मुंबईपर्यंतची किनारपट्टी रक्षणासाठीताब्यात दिली. ह्या नव्या आव्हानाबरोबर कान्होजींना एकाच वेळी परकीय आणि स्वकीयांबरोबर लढा द्यावालागत होता.१७०७ मध्ये मराठेशाही मध्ये फुट पडल्यावर मात्र त्यांनी कोणाचीही बाजु न घेता स्वतंत्रपणेकारभार सुरु केला. मात्र पुढे त्यांचे बालमित्र असलेले बाळाजी विश्वनाथ पेशवे यांनी त्यांचे मन वळवून सातारागादी बरोबर वळवंड, लोणावळा येथे तह करवला.कोकणाबरोबरच कच्छ, सौराष्ट्रापासून त्रावणकोर, कोचीनपर्यंतची सागरी सत्ता कान्होजींच्या हाती होती. सागरीभागात मुक्तपणे संचार करणार्या परकीयांवर निर्बंध आले होते.



१६९८ पासून मराठी राज्याची सारी सागरी सत्ताकान्होजींकडे आली होती. त्यांच्या परवान्याशिवाय कोणीही सागरावर व्यापार करू शकत नव्हते. ह्याचाप्रतिकार करण्याचे परकीयांनी ठरविले. सर्व परकीयांनी एकत्रित येऊन कान्होजींना संपविण्याचे ठरविले, तरीहीत्यांनी इंग्रज, पोर्तुगीजांनाही पराभूत केले. शत्रूच्या आक्रमणांना तोंड देण्यासाठी कान्होजींनी दूरदृष्टीनेअगोदरच अनेकांशी मैत्रीचे संबंध ठेवलेले होते. अशा संबंधांच्या मदतीने त्यांनी आपले आरमार अधिकशस्त्रसज्ज केले. पोर्तुगीजांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रनिर्मितीचा कारखाना आणि कुलाबा, विजयदुर्ग, सुवर्णदुर्गयेथे सुधारीत पद्धतीचे जहाज बांधणीचे कारखाने त्यांनी उभारले. या सुसज्जतेसह कान्होजींनी समुद्रकिनार्यावर एक दबदबा निर्माण केला होता.कान्होजींचा लढा धार्मिक आक्रमणाची धार कमी करण्यासाठीही होता. कान्होजी आंग्रे यांनी कोकणातीलमंदिरांसह पंढरपूर, आळंदी, जेजुरी, तुळजापूर येथील देवस्थानांना इनाम व रोख देणग्याही दिल्या. छत्रपतीशिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरही औरंगजेबाला मराठी मुलूख काबीज करता आला नाही. यामागे अनेक शूरसरदारांचे योगदान होते. कोकण किनार्यावरील राजसत्तेचा जागता पहारा असणारे कान्होजी त्यांतीलच एक !




आज त्या शुरविराच्या निर्वानाचा दिवस दिनांक; ४ जुलै, १७२९ रोजी कान्होजींनी जगाचा निरोप घेतला.


आशा या थोर पुरुषास मानाचा मुजरा !!


कान्होजी आंग्रे यांची मुद्रा -
"शाहूकार्ये धुरंदर तुकोजी तनुजनमानहा कान्होजी
सरखेलस्य मुद्री येकम विराजते"



" जय भवानी!!......जय शिवराय!! "

Tuesday, June 29, 2010

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !!


छत्रपती शिवरायांच्या मृत्यूनंतर स्वराज्य टिकवण्यासाठी, वाढवण्यासाठी अंतर्गत कलहाशी व शत्रूशी समर्थपणे व प्राणपणाने लढणारे धर्मवीर!
मृत्यूचे आव्हान पेलुनी, तोच वारसा आम्हाला दिला।

शिवरायांचा शंभू छावा, हिंदू म्हणुनी अमर जाहला।।
वरील दोन ओळींतच खर्‍या अर्थाने संभाजी महाराज यांच्या चरित्राने स्वराज्याला दिलेला महान असा स्वराष्ट्रवाद, स्वधर्माभिमान व्यक्त होतो.
संभाजीराजांचा जन्म छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पत्नी सईबाई यांच्या पोटी जेष्ठ शु. १२, शके १५७९ रोजी पुरंदर गडावर झाला. ते केवळ २ वर्षांचे असतानाच त्यांच्या मातोश्रींना देवाज्ञा झाली. अशा प्रकारे लहानपणापासून त्यांच्यावर काळाच्या आघाताला सुरूवात झाली. सईबाईंच्या पश्र्चात राजमाता जिजाबाई शंभूराजांच्या पालनपोषणाची सर्व व्यवस्था पाहू लागल्या. केशव भट आणि उमाजी पंडित हे शंभूराजांचे गुरू होते. संभाजीराजांना कोणकोणते शिक्षण दिले गेले हे सभासद व चिटणीसांच्या बखरीतूनमोठ्या प्रमाणावर स्पष्ट होते.

‘‘संभाजीराजांनी विद्याभ्यास करावा, त्याला सुशिक्षित करावे म्हणून त्याला घोड्यावर बसविणे, शास्त्रविद्या, तालीम यांचे शिक्षण देवविले. अष्टप्रधान यात राजपुत्राची गणना आहे. सर्व आमात्य राजाचा वामभुज; युवराज, राजपुत्र हा सत्यभुज असे आहे. त्याअर्थी तो सुशिक्षित असावा म्हणून लेखनादि अभ्यास करविला. दंडनिती, राजधर्म हे सांगविले. राजपुत्र धर्म, पितृसेवा कायावाचामने करावी. पित्याने संतुष्ट होऊन युवराजपद कारभार सांगितला असा गर्वारुढ उत्पन्न होऊ नये. राजाचे कुळी अनीतिमान पुत्र निर्माण झाला म्हणजे ते राज्य व कुल शीघ्र क्षयास जाते. म्हणुन बहुत नीतिने रक्षिणे तसे रक्षिले. आणि मातबर सरकारकून प्रौढ यांच्यापाशी बसावे, दरबारात बसावे म्हणजे कारभार माहित होत जाईल.’’ अशी नोंद ऐतिहासिक कागदपत्रांत आढळते. अशा प्रकारे संभाजीराजांचे औपचारिक आणि अनौपचारिक शिक्षण झाले. याचबरोबर सैन्याचे नेतृत्व करण्याचा अनुभव त्यांना मिळावा या हेतूने त्यांना छत्रपती शिवाजी महाराज स्वत:बरोबर एखाद्या आघाडीवर नेत असत किंवा पाच-दहा हजार सैन्याचे नेतृत्व त्यांना देत असत. संभाजीराजांची अतिशय काटेकोर पद्धतीने जडणघडण होत गेली. याच दरम्यान त्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांना खूप मोठा अनुभव मिळाला. हा अनुभव होता छत्रपती शिवाजी महाराजांबरोबरील आग्रा भेटीचा. या काळात महाराजांच्या सहवासात त्यांच्या अनेक पैलुंचा, गुणांचा संभाजीराजांवर नकळतपणे प्रभाव पडत गेला. वेगळ्या अशा राजकारणी धोरणांची, मुत्सद्दीपणाची त्यांना ओळख झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अद्भूत, अचाट साहसाचे ते साक्षीदार होते. त्यानंतरच्या काळात वेशांतर करून स्वराज्यात दाखल होईपर्यंत त्यांना प्रत्यक्ष समाज पाहता आला. हा अनुभव त्यांना पुढे राज्यकारभार चालविण्यासाठी खूप उपयोगी पडला. मिर्झाराजांकडे ओलीस राहणे, शाही फर्मान स्वीकारणे या गोष्टी देखील त्यांना दिशादर्शक ठरल्या. खूप लहान वयातच शत्रूचा सहवास त्यांना दीर्घकाळ लाभल्यामुळे त्यांची कार्यपद्धती त्यांना अनुभवता आली. विद्याभ्यास, शस्त्रविद्या, दरबारातील कारभार, युद्धविद्या, सैन्याचे नेतृत्व या सर्व गोष्टीत संभाजी राजे पारंगत तर होतच होते. त्याबरोबरच त्यांचे संस्कृत व हिंदी या भाषांवरही प्रभुत्व होते. त्यांनी ४ काव्यग्रंथ लिहिले आहेत. त्यांच्या बुधभूषण या संस्कृत ग्रंथात दोन अध्याय असून पहिल्या अध्यायात ‘स्वकुल’ व ‘स्वकाव्य वर्णन’ या विषयीचे लेखन आढळते तर दुसर्‍या अध्यायात ‘राजनिती’ व ‘दुर्ग निरूपण’ या विषयीची सविस्तर माहिती संभाजी महाराजांनी लिहिलेली आढळते.

शिवराज्याभिषेकानंतर त्यांनी अनेक मोहिमांवर नेतृत्व केले. पण खर्‍या अर्थाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतरच संभाजीमहाराज लोकांना कळाले. छत्रपतींचा वारसदार हा तेवढाच कार्यकुशल व पराक्रमी आहे हे त्यांनी प्रत्येक बाबतीत सिद्ध केले. केवळ ९ वर्षांच्या काळात त्यांनी १२८ लढाया जिंकून आपल्या पित्याच्या नावाला खूप मोठा सन्मान प्राप्त करून दिला. याच काळात कोकणात धर्माच्या नावाखाली हैदोस घालणार्‍या धर्मांध लोकांचा त्यांनी बंदोबंस्त केला. गोवा येथेही पोर्तुगिजांवर हल्ला केला. या स्वारीच्या वेळी त्यांनी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता खाडीमध्येच घोडा घालून आदर्श नेतृत्त्व सिद्ध केले. धर्मांतरित लोकांना पुन्हा हिंदू धर्मात घेऊन त्यांनी शिवाजी महाराजांचे कार्य सुरू ठेवले. सततच्या स्वार्‍यांमुळे त्यांनी औरंगजेबाच्या नाकीनऊ आणले होते. त्यामुळेच तो चिडून दक्षिणेत आला होता. आक्रमक सेनानी व कुशल प्रशासक म्हणून त्यांनी राज्यकारभार फार कुशलतेने सांभाळला व उत्तमपणे शासनव्यवस्था सांभाळली. छत्रपती संभाजी महाराजांची मुद्रा पुढीलप्रमाणे होती,
श्री शंभो: शिवजातस्य मुद्रा द्यौरिव राजते।

यदंकसेविनी लेखा वर्तते कस्य नोपरि।।


आपल्या कारकीर्दीत छत्रपती संभाजी महाराजांना अतिशय विषम अशा परिस्थितीस सातत्याने तोंड द्यावे लागले. अनुभवी औरंगजेब सुमारे सात लाख सैन्यासह स्वराज्यावर चालून आला होता, आणि तरुण, अननुभवी संभाजी राजांकडे सैन्य होते केवळ तीस ते पस्तीस हजार. शिवाय घरभेदी, फितूर लोकांच्या कारवाया होत्याच. पण या सर्व परिस्थितीतही छत्रपती संभाजी राजांनी मोगली सैन्याला दाद दिली नाही, औरंगजेबाला यश लाभले नाही. पण फितुरांमुळे संभाजीराजे शत्रुच्या ताब्यात सापडले. १६८९ मध्ये संभाजी राजे विशाळगडाकडून रायगडाकडे जाताना संगमेश्र्वर येथे मुक्कामी थांबले होते. फितुरांकडून बातमी मिळाल्यानंतर मुखर्रबखान या मोगली सरदाराने त्यांना ताब्यात घेतले. औरंगाजेबाने त्यांना तुळापूर येथे आणले. तेथे त्यांच्यावर धर्म बदलण्यासाठी दबाव आणण्यात आला.गुढीपाडवा म्हणजेच छत्रपति संभाजी महाराज पुण्यतिथी.पाडवा. हिंदुं नववर्ष दिन. या दिवशी हिंदु घरोघरी गुढ्या उभारतात. त्याची 'याद' मनात ठेऊन औरंगजेबाने आजची संध्याकाळ निवडली होती. की उद्या पहाटे या हिंदुंना - काफरांना त्यांच्या प्राणाहून प्रिय असणार्या राजाच्या मस्तकाचीच गुढी - भाल्यावर टांगवून मिरवून दाखवू.बहादुरगडावर (मौजे पेडगाव, ता.श्रीगोंदा) संभाजी महाराजांची धिंड काढलेली होती. एका बोडख्या घाणेरड्या उंटावर संभाजी महाराजांना व कवि कलशांना उलटे बसवले होते. साखळदंडाने बांधलेले. त्या दोघांच्या अंगावर विदुशकासारखे झिरमिळ्यांचे चट्ट्यापट्टयाचे कपडे चढवलेले होते.गळ्यातील शिवरायांनी चढवलेली कवड्याची माळ उतरवून गुरांनाही सहन होणार नाही अशी काथ्याची पेंढी बांधलेली होती. दोघांच्याही डोक्यावर एखाद्या अट्टल गुन्हेगारांना बांधाव्यात अशा, कुराणमध्ये सांगितलेल्या आदेशानूसार इराणी लाकडी टोप्या बसवलेल्या होत्या. त्याच प्रमाणे 'तख्तेकुलाह' म्हणजे लाकडी फळ्यांचा खोडा मानेवर ठेऊन त्याला दोन्ही हात बांधलेले होते त्यांच्या देहाचे हाल करण्यात आले. औरंगजेबाने या प्रसंगी क्रौर्याची परिसीमा गाठली. पण छत्रपती संभाजी महाराजांनी धर्मपरिवर्तनास होकार दिला नाही. धर्मासाठी, मुख्य म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी स्वत:चे बलिदान दिले..................................

त्यांच्या समाधीचे दर्शन घेताना कोण्या एका कवीने सहजपणे उद्गार काढले आहेत,

कविराजकुशल, राजकार्यधुरंधर हा सिंहाचा छावा,

पिढ्यापिढ्यांना देत प्रेरणा घेई येथे विसावा.


"...हा युवराज लहान आहे तरी धैर्यशील व आपल्या बापाच्या कीर्तीस साजेल असाच शूर आहे. शिवाजीराजांसारख्या युद्धकुशल पित्याच्या बरोबर राहून तो युद्धकलेत तरबेज झालेला असून चांगल्या वयोवृद्ध सेनापीचीही बरोबरी करील इतका तो तयार आहे. तो मजबूत बांध्याचा असून अतिस्वरुपवान आहे. त्याचे सौंदर्य हाच सैनिकांचे त्याचेकडे आकर्षण वाढविणारा मोठा गुण आहे. सैनिकांचे त्याच्यावर फार प्रेम आहे व ते त्याला शिवाजीसारखाच मान देतात. फरक इतकाच ह्या सैनिकांस संभाजीच्या हाताखाली लढण्यात विशेष धन्यता वाटते..."हे वर्णन केले आहे, 1672च्या सुमारास हिंदुस्थानात प्रवास करणा-या ऍबे कँरे या फ्रेंच प्रवाशाने.

संभाजीराजांचा जाज्वल्य धर्माभिमान !

संभाजीराजांच्या बलीदानाचा इतिहास लोकांना नीट माहीत नाही. १ फेब्रुवारी १६८९ या दिवशी सख्खा मेहुणा गणोजी शिर्के याच्या फितुरीमुळे संगमेश्वर या ठिकाणी संभाजीराजे काही वतनदारांची गाऱ्हाणी ऐकत असतांना पकडले गेले. त्या वेळी मोगलांनी लाखो सैनिकांच्या बंदोबस्तात राजांची धिंड काढली. त्यांना शारीरिक आणि मानसिक यातना दिल्या. विदूषकाचा पोषाख घालून, लाकडी सापळयात हातपाय अडकवण्यात आले. रक्‍तबंबाळ अवस्थेतील संभाजीराजांचे तत्कालीन चित्रकाराने रंगवलेले चित्र नगर येथील संग्रहालयात आजही आहे. असंख्य यातना सहन करणार्‍या या तेजस्वी हिंदु राजाची नजर अत्यंत क्रुद्ध आहे, असे त्या चित्रात दिसते. संभाजीराजांच्या स्वाभिमानाचा परिचय त्या क्रुद्ध नजरेवरूनच होतो.१५ फेब्रुवारी १६८९ या दिवशी औरंगजेबाबरोबर राजांची दृष्टीभेट पेडगावच्या किल्ल्यात झाली. `काफिरांचा राजा सापडला' म्हणून औरंगजेबाने नमाज पढून अल्लाचे आभार मानून अत्यानंद व्यक्‍त केला. त्या वेळी संभाजीराजांना औरंगजेबाचा वजीर इरवलासखान याने शरण येण्याचे आवाहन केले. संतप्‍त संभाजीराजांनी औरंगजेबाला मुजरा करण्यास नकार दिला. तो एकनिर्णायक क्षण होता. महाराजांनी वैयक्‍तिक सुखाच्या अभिलाषेपेक्षा हिंदुत्वाचा अभिमान महत्त्वाचा मानला. आपल्या वडिलांनी निर्माण केलेली स्वाभिमानाची महान परंपरा त्यांनी जपली. यानंतर दोन दिवसांत औरंगजेबाच्या अनेक सरदारांनी त्यांचे मन वळवण्याचा प्रयत्‍न केला. त्यांना `मुसलमान झाल्यास जीवदान मिळेल', असे सांगण्यात आले; परंतु स्वाभिमानी संभाजीराजांनी या मुसलमान सरदारांचा सतत अपमान केला.धर्मासाठी बलीदान करून इतिहासात अमर झालेले शंभूराजेशेवटी पापी औरंग्याने त्यांचे डोळे फोडले, जीभ छाटली तरीही राजांना मृत्यू स्पर्श करू शकला नाही. दुष्ट मोगल सरदारांनी त्यांना प्रचंड यातना दिल्या. त्यांच्या दिव्य धर्माभिमानाबद्दल त्यांना हे सारे भोगावेच लागले. १२ मार्च १६८९ या दिवशी गुढीपाडवा होता. हिंदूंच्या सणाच्या दिवशी त्यांचा अपमान करण्यासाठी ११ मार्चच्या फाल्गुन अमावस्येला संभाजीराजांची हत्या करण्यात आली. भाल्याला त्यांचे मस्तक टोचून मोगलांनी त्याची धिंड काढली. अशा प्रकारे १ फेब्रुवारी ते ११ मार्च असे ३९ दिवस यमयातना सहन करून संभाजीराजांनी हिंदुत्वाचे तेज वाढवले. धर्मासाठी बलीदान करणारा हा राजा इतिहासात अमर झाला. औरंगजेब मात्र राजधर्म पायदळी तुडवणारा इतिहासाच्या दरबारातील गुन्हेगार ठरला.
शिवाजी आणि संभाजी हे आहेत महाराष्ट्र धर्माचे मूलमंत्र ।

जगावे कसे सांगे शिवचरित्र आणि मृत्यूचा आदर्श देई शंभूचरित्र ।।

महाराष्ट्राचा तेजस्वी आणि प्रेरणादायी इतिहास दुर्दैवाने गोर्‍या कातडीच्या इंग्रजांनी कलंकित करण्याचा प्रयत्‍न केला आणि त्यामुळे समाजाची बराच काळपर्यंत दिशाभूल झाली होती.

छत्रपती संभाजी महाराज यांच्यावरील ग्रंथांची सूची :

१. छावा - शिवाजी सावंत - कॉन्टिनेन्टल

2. संभाजी - विश्र्वास पाटील - मेहता पब्लिशिंग

3. शिवपुत्र संभाजी - डॉ. कमल गोखले - कॉन्टिनेन्टल प्रकाशन

४. छत्रपती संभाजी - वा. सी. बेंद्रे

५. मराठ्यांची धारातीर्थे - प्रवीण व. भोसले - नरसिंह पब्लिकेशन्स

६. शंभूराजे - प्रा. सु. ग. शेवडे - धर्मसेवा prakaashan

7. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज - अरुण जाखडे - पद्मगंधा प्रकाशन

Saturday, June 26, 2010

वृत्तपत्रे ........ समाजाच्या हितासाठी की महापुरुशांच्या बदनामी साठी

" उद्धव ठाकरे व राज ठाकरे यांना एका व्यासपीठावर आणणे छत्रपती शिवाजी महाराज यांनाही जमले नाही.---- महाराष्ट्र टाइमस "

अरे असल्या वर्त्तमान पत्रावर बातम्या देनाऱ्याचे कान फोडले पाहिजेत !!!!
असल्या राजकारणात छ. शिवजी महाराजांची बदनामी का करता ?
आता कोठे गेले " सेनेवाले " ?????
का राजकीय स्वार्थासाठी त्याना हे पण चालते ?
लाज वाटली पाहिजे छत्रपतींच्या नावाची बदनामी करताना !!!

Friday, June 25, 2010

शिवाजी महाराज्यांची वंशावळ




महाराजांचा वंश गागाभट्टानी जो सिदध केला.तो प्रभु श्री रामाचा इश्वाकु वंशाचेसिसोदीया घराणे जेव्हा चितॊड कोसळले,त्यावेळी ज्या दोन रजपुत शाखा होती त्यातील एक महाराष्ट्रात आली ते म्हणजे पुढे भोसले.हे गागाभट्टानी मांडुन दाखवले.शिवाजी महाराजांच्या पराक्रमाला जी अनुकूल परिस्थिती मिळाली तिची सुरवात त्यांचा अजोबा मालोजी यांच्याच कर्तबगारीने होतो.शिवाजीचे पणजा बाबाजी यांचीदेखील इतिहासात प्रथम ओळ्ख होते ती मालोजीबरोबर त्यांच्या घृष्णेश्वर येथील शिलालेखाने.हे घराणे दॊलताबाद वेरुळच्या बाजुने नशीब काढण्यासाठी अहमदनगरच्या दक्षिणेला दॊंड जवळ पांडे-वडगाव या ठिकाणी आले.हे गाव अदिलशहा व निजामशहा यांच्या सरहद्दीवर असल्याने तेथील जहागिरी संभाळण्याचे काम थोडे जोखमीचे होते.त्याच्या पराक्रमाला जोड मिळाली ती फ़लटणच्या निंबाळ्काराचे चालुन आलेले स्थळ.मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला १५९४ व १५९७ ला दोन मुले झाली.त्यांची नावे शहाजी व शरीफ़जी ठेवण्यात आले.पुढे शहाजीना संभाजी, शिवाजी व व्यंकोजी ही ३ मुले झाली.मालोजीचा मुलगा शहाजी व लखुजी जाधवाची मुलगी जिजाऊ हे लहानपणी एकत्र खेळ्त असत.पण घरातील विरोधामुळे त्यांनी संबंध नाकारले. मालोजीला कमी लेखले गेले.मालोजी पुन्हा वेरुळला येऊन शेती करु लागले.तेथे त्यांना देवीचा दृष्टांत होऊन द्रव्याने भरलेला हंडा सापड्ला.त्या पॆशांच्या उपयोग करुन मालोजीनी हजारो घोडे घेतले व आपली फ़ॊज तयार करुन सरदार बनले.निजामशाहीवर मोगलाचे संकट आल्याने मालोजी भोसले निजामशाहीत कर्तबगार सरदार बनले.व लखुजी जाधवाने आपली मुलगी शहाजीना देऊन सोयरीक जमवली।भोसले घराण्यांच्या उत्कर्षाचा पाया मालोजी यांनी घातला.वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदीराचा जीर्णोध्दार करुन मालोजीची पत्नी उमाबाई हिच्या हस्ते अभिषेक करण्यात आले मंदीरच्या तटामध्ये दास मालोजी बाबाजी भोसले व विठोबा बाबाजी भोसले असा आपला व आपल्या भावाच्या नावावर बसवलेला शिलालेख आजही पहावयास मिळतो.

मालोजीनी सातारातील श्रीशिखरशिंगणापुरच्या डोंगराच्या पायथ्याशी भिंत बांधुन त्याने तलाव तयार केला ,यात्रेकरुचा दुवा मिळवला.निजामशाहीने ऒरंगाबादेत ’मालपुरा’ व ’विठापुरा’असे भोसले घराण्याच्या नावे दोन पेठा वसवल्या.मालोजीचा पराक्रम वाढतच गेला.आपल्या उपयुक्त कामगिरीने मालोजीनी बुह्राणपुरच्या निजामाचा विश्वास संपादन केला.त्यामुळे सरहदवरील इंदापुरच्या बाजुच्या शत्रुचा बदोबस्त करण्याची कामगिरी निजामाने मालोजीवर सोपवले.या वेळी झालेल्या एका लढाईत मोठा पराक्रम गाजवुन रणक्षेत्रावर मरण पावले.भोसले घराण्यातील वीरतेचे ’पहिले स्मारक’ मालोजीची छ्त्रीरुपाने इंदापुरभुमीवर स्थापन झाले.जरी मालोजीचा अंत झाला तरी भोसले घराण्याच्या पराक्र्माची सुरवात केले.व शिवाजींना स्वराज्य स्थापण्यासाठी मोठी प्रेरणा दिली.

शहाजीराजे भोसले


शहाजीराजे भोसले हे एक कर्तबगार सेनापती होती, शिवाजीच्या स्वराज्य स्थापनेसाठी त्यांचे मोलाचे सहकार्य होते, राजदरबारी नॊक्ररी असतानाही शहाजीनी तटस्थ भुमिका घेऊन अप्रत्यक्षपणे त्यांनी स्वराज्य स्थापनेला पाठिंबा दर्शवला.शहाजी मुस्तद्दी होते.विजापुरच्या बादशहाला ते शिवबाबद्दल असे सांगत की ’पोरगा माझे ऎकत नाही तुम्ही काय तो बदोबस्त करावा’ यावरुन शहाजीची ना उत्तेजन ना विरोध अशी भुमिका दिसुन येते. शहाजी राजाना स्व:ताचे राज्य व्हावे अशी मनापासुन ईच्छा होती परंतु तेवढी कुवत त्यांच्यात निर्माण झाली नव्हती. शहाजीच्या स्वराज्य स्थापनेची ईच्छा जिजाऊनी शिवाजीच्या रुपानी साकार केले. जिजाऊनीं लहानपणा पासुनच शिवाजीवर योग्य संस्कार करुन शिवकल्याण राजा घडविला.मालोजीचे लग्न फ़लटणचे देशमुख जगपालराव निंबाळकर यांची बहीण दिपाबाई हिच्याशी झाले होते.मालोजीस लवकर संतान होइना म्हणुन मालोजी व दिपाबाई यांना वाईट वाटत होते.त्यांनी नगरचा पिरशहा शरीफ़ यांस नवस केला.व त्याच्या अनुग्रहाने दिपाबाईला २ मार्च १५९५ ला पुत्रप्राप्ती झाली त्यांचे नाव शहाजी ठेवण्यात आले.पुढे १५९७ला दुसरा मुलगा झाला त्याचे नाव शरीफ़जी ठेवण्यात आले.मालोजी राजे व फ़लटणचे लखुजी जाधव यांच्या गाढ मॆत्री होती. त्यामुळे लखुजी जाधवांची कन्या जिजाऊ व मालोजी राजांचे पुत्र शहाजीराजे यांचा विवाह संपन्न झाला.शहाजी राजे भोसले व जाधव राव यांची कन्या जिजाबाई जा उभयांताचे लग्न इ स १६०५ मार्गशीष शुद्ध ५ शके १५२७, विस्ववासु नम संवत्सर फसली सन १०१५ या साली झाले.लग्नानंतर ५ वर्षानी मालोजी राजाचे इंदापुर नजीक रणभुमी वर देहवसान झाले.शहाजींना तीन राण्या होत्या.जिजाबाई,तुकाबाई,नारसाबाई अशी त्यांची नावे होती.जिजाऊच्या पोटी संभाजी व शिवाजींनी जन्म घेतला.तर तुकाबाईच्या पोटी व्यंकोजीनीं जन्म घेतला.व्यंकोजीना शहाजीनी बेगलॊरच्या जहागिरीवर पाठवले तर शिवाजींना पुण्याच्या जहागिरीत ठेवले.शिवाजींच्या मोठ्या बंधुचे नाव संभाजी होते त्याला शहाजीनी स्वत:जवळ ठेवले. पुण्याच्या जहागिरीत कोणत्याही प्रकारे अडचण येऊ नये म्हणुन जिजाऊ व शिवराय यांच्या सोबत श्यामराज रांझेकर, बाळकृष्णपंत हणमंते, रघुनाथ बल्लाळ अत्रे, कान्होजी जेधे नाईक व यांच्याबरोबर इतर अनेक मातब्बरांना जय्यत तयारीनिशी राज्यकारभारासाठी पाठवले होते. व राज्यकारभारासाठीची आवश्यक राजमुद्राही शहाजीराजांनीच शिवरायांना दिली. अशा प्रकारे स्वराज्य स्थापनेस अनुकुल परिस्थिती शहाजीराजानी करुन दिली।
अहमदनगरजवळील भातवडीच्या रणांगणात निजामशाही संपवण्यासाठी भारतवर्षातील सर्व इतर सत्ता एकत्र आल्या होत्या. निजामशाही वाचवण्यासाठी या एकत्रित फौजांचा सामना शहाजीराजे वजीर मलिक अंबरच्या साथीने करीत होते (इ. स. १६२४). त्यांना त्यात यश मिळाले. शहाजीराजांचा ऐतिहासिक विजय झाला. याच लढाईत शहाजीराजांचे बंधू शरीफजी धारातीर्थी पडले. पण पुढे मलिक अंबरची दरबारातील राजकारणी वागणूक पाहून शहाजीराजे आदिलशाहीत गेले. त्यानंतर १६३९ साली आदिलशहाकडून सरलष्कर ही पदवी त्यांना देण्यात आली व बंगळूरची जहागिरीही त्यांना प्राप्त झाली. आदिलशाहीत असताना शहाजीराजांनी पुणे परगणा निजामशाहीकडून काबीज केला होता.शहाजीराजे हे शुर सेनानी होते निजामशाहीत त्यांचे फ़ार वर्चस्व होते. शहाजीराजे स्वत: राजे बनु शकत होते परंतु तेवढी प्रबळता त्यांच्यात आली नव्ह्ती ही पुढील उदाहरणावरुन दिसुन येते,जेव्हा शहाजहान आणि मंहमद अदिलशहा यांनी निजामशाही संपवली त्यावेळी शहाजीनी निजामचा वारस असलेल्या मुर्तीझाला राजे केले. अहमदनगर जिल्हातील संगमनेर तालुक्यातील पेमगिरीच्या किल्ल्यावर ही घटना घडली.मुर्तीझाचे वय लहान असल्याने राज्यकारभाराची सर्व जबाबदारी ही शहाजी राज्यावर होती शहाजीनी तो राज्यकारभार पुढे ३ वर्षे चालवलाशहाजी हे राजकारणी पुरुष होते.विजापुरच्या पदरी असताना शहाजी राजांनी अनेक मोठमोठे विजय मिळवुन दिले.परंतु मराठा सरदारामधील हेवेदाव्यामुळे विजापुर दरबारात त्यांचा स्थांनास व प्रतिष्ठेत नेहमी चढऊतार होत असे.मुधोळच्या घोरपड्यांनी विजापुरच्या बादशहाचा गॆरसमज करुन दिला. आदिलशहाचा मुख्य वजीर नवाब मुस्तफाखान याने बाजी घोरपडे, मंबाजी भोसले, मंबाजी पवार, बाळाजी हैबतराव, फतहखान, आझमखान यांच्या साहाय्याने शहाजीराजांना दगा देऊन कर्नाटकातील जिंजीजवळ कैद केले. साखळदंडांनी बांधून भर विजापुरातून शहाजीराजांना दरबारात हजर करण्यात आले. तो दिवस होता २५ जुलै, १६४८ चा. विजापुरच्या बादशहाने शहाजीना भिंतीत चिणुन मारण्यांची शिक्षा फ़र्मावली.पंरतु शिवाजी महाराजांनी दिल्ली च्या शहाजहानला पत्र पाठवुन विजापुरच्या बादशहावर दबाव आणला व शहाजीची सुटका करुन घेतली.शहाजीराजांची दि. १६ मे, १६४९ रोजी सन्मानपूर्वक सुटका झाली. शहाजीराजांच्या कारकीर्दीचा आढावा घेतला असता असे लक्षात येते की त्यांनी स्वाभिमान राखत आदिलशाही, मुघलशाही व निजामशाही - या सर्व सत्ताधीशांकडे काम केले. त्यांच्या कारकीर्दीचे महत्त्वाचे टप्पे पुढीलप्रमाणे,
इ। स. १६२५ ते १६२८ - आदिलशाही
इ. स. १६२८ ते १६२९ - निजामशाहीइ. स. १६३० ते १६३३ - मुघलशाही
इ.स. १६३३ ते १६३६ - निजामशाही
इ।स. १६३६ पासून पुढे - आदिलशाही
पुढे १६६१-६२ दरम्यान शहाजीराजे महाराष्ट्रात आले होते. त्यांनी त्यानंतरचा काही काळ शिवाजीराजे व जिजाबाईंसमवेत घालवला. आपण लावलेल्या स्वराज्याच्या रोपट्याचा आज विशाल वटवृक्ष झाल्याचे पाहून ते धन्य झाले. काही काळानंतर ते पुन्हा आपल्या जहागिरीत परतले. माघ शुद्ध ५, म्हणजेच २३ जानेवारी,१६६४ रोजी होदेगिरीच्या जंगलात शिकारीला गेले असताना त्यांच्या घोड्याचा एका वृक्षवेलीमध्ये पाय अडकला व ते खाली कोसळले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला,

Tuesday, June 22, 2010

महाराणा प्रताप


(महाराणा प्रताप यांच्या चरित्राचे अभ्यासक विद्याधर पानट यांच्या लेखनीतून आणि महाराणा प्रताप म्हणजे श्रीशिवछत्रपतींचे स्फूर्तिस्थान या पुस्तकाचा संदर्भ घेउन हाती आलेली ही अल्पशी माहिती श्री चरनी अर्पण )

" माई एहड़ा पूत जण, जेहड़ा राण प्रताप।अकबर सूतो ओधकै, जाण सिराणै साप॥ "

महाराणा प्रताप यांचा जन्म इसवी सन १५४० मध्ये झाला. मेवाडचा राणा द्वितीय उदयसिंह यास ३३ अपत्ये होती. या सर्वांत मोठा प्रतापसिंह. स्वाभिमान व सदाचार हे प्रतापसिंहाचे मुख्य गुण होते. तो बालपणापासूनच धीट आणि शूर होता. त्याचे हे गुण पाहूनच मोठेपणी हा महापराक्रमी होणार याची सर्वांना कल्पना आली होती. शिक्षणापेक्षा मैदानी खेळ व शस्त्रास्त्रे चालवणे त्याला जास्त आवडत असे. महाराणा प्रतापसिंहांच्या काळात दिल्लीच्या सिंहासनावर मोगल बादशहा अकबराची सत्ता होती. तो हिंदूंच्या बळाचा वापर करून हिंदु राजांनाच गुलाम बनवत असे. अनेक रजपूत राजांनी तर मानसन्मानाच्या लालसेने आपल्या उज्ज्वल परपरांना व क्षात्रधर्माला तिलांजली देऊन आपल्या लेकी- सुनांनाही अकबराच्या अंत:पुरात पोहोचवले होते. उदयसिंहाने आपल्या मृत्यूपूर्वी धाकट्या पत्‍नीचा मुलगा जगमल्ल याला उत्तराधिकारी नेमले. प्रतापसिंह हा जगमल्लपेक्षा मोठा होता. प्रभु रामचंद्रांप्रमाणे पित्याची आज्ञा प्रमाण मानून सिंहासनाचा त्याग करून मेवाडपासून दूर निघून जाण्याची तयारी प्रतापसिंहाने दर्शवली. परंतु तेथील सरदारांना ही गोष्ट मुळीच योग्य वाटली नाही. कारण रजपूत घराण्यांमध्ये पित्यानंतर ज्येष्ठ राजपुत्रालाच सिंहासनावर बसवायचे अशी प्रथा होती. याशिवाय जगमल्ल हा प्रतापसिंहाप्रमाणे शूर, स्वाभिमानी व साहसी नव्हता. त्यामुळे प्रतापसिंहालाच सिंहासनावर बसवायचे आणि जगमल्लाला सिंहासनाचा त्याग करण्यास भाग पाडायचे, असे सर्वांनी मिळून ठरवले. सर्व सरदारांच्या व मेवाडजनांच्या प्रबळ आग्रहाला मान देऊन प्रतापसिंहाने राज्याभिषेक करवून घेतला.
मेवाडच्या चारही सीमा शत्रूंनी घेरल्या होत्या. महाराणा प्रतापचे सख्खे भाऊ शक्‍तिसिंह व जगमल्ल हे दोघेही अकबराला मिळाले होते. शत्रूशी समोरासमोर लढाई करण्यासाठी पुरेसे सुसज्ज सैन्य उभे करणे, ही पहिली समस्या होती आणि त्याकरिता अपार धनाची आवश्यकता होती; पण महाराणा प्रतापचा खजिना रिकामा होता. याउलट अकबराजवळ भरपूर सैन्य, अपार संपत्ति व मुबलक साधने होती. अशा अवघड प्रसंगीही महाराणा प्रताप विचलित वा निराश झाला नाही. अकबरापेक्षा आपण कमजोर आहोत, असे निराशेचे उद्‌गारदेखील त्याने कधी काढले नाहीत. आपली मातृभूमि मोगलांच्या गुलामीतून लवकरात लवकर कशी मुक्‍त होईल, असा एकच ध्यास प्रतापसिंहाला लागला होता. एक दिवस त्याने आपल्या विश्‍वासू सरदारांची सभा घेतली आणि धीरगंभीर व ओजस्वी वाणीने सर्व सरदारांना कळवळून आवाहन केले. तो म्हणाला की, ``शूर वीर रजपूत बांधवांनो ! आपली मातृभूमि, पुण्यभूमि मेवाड आजही मोगलांच्या ताब्यात आहे. आज मी आपणासमोर प्रतिज्ञा करतो की, चितोड स्वतंत्र होईपर्यंत मी सोन्याचांदीच्या ताटात जेवणार नाही. मऊ गादीवर झोपणार नाही, राजप्रासादात रहाणार नाही, याऐवजी मी पत्रावळीवर जेवेन, जमिनीवर झोपेन व झोपडीत वास्तव्य करेन आणि चितोड स्वतंत्र होईपर्यंत दाढीही करणार नाही. शूर सरदारांनो ! माझी ही प्रतिज्ञा पूर्ण करण्याकरिता तन-मन-धनाने आपण सहकार्य द्याल, अशी आशा आहे.'' प्रतापसिंहाची कठोर प्रतिज्ञा ऐकून तेथे उपस्थित असलेल्या सर्व सरदारांच्या अंत:करणात उत्साहाची लहर उठली. एकमुखाने त्यांनी घोषणा केली की, ``हे प्रभो, आमच्या शरीरातील रक्‍ताच्या शेवटच्या थेंबापर्यंत आम्ही चितोडच्या मुक्‍तीसाठी राणा प्रतापसिंहाला साहाय्य करू व त्याच्याबरोबर खांद्याला खांदा देऊन लढू ! आम्ही मरण पत्करू; पण आमच्या ध्येयापासून हटणार नाही. राणाजी, आम्ही सर्व आपल्या पाठीशी उभे आहोत, याची खात्री ठेवा. केवळ आपल्या इशार्‍याचाच अवकाश की, आम्ही आत्मसमर्पण करायला तयार आहोत.'' राणा प्रतापला आपला मांडलिक बनवण्याकरता अकबराने खूप प्रयत्‍न केले; पण ते व्यर्थ गेले. राणा प्रतापशी समझोता न होऊ शकल्यामुळे अकबराने चिडून युद्ध पुकारले. राणा प्रतापही युद्धाच्या तयारीला लागला. त्याने आपली राजधानी दुर्गम अशा अरवली पहाडात कुंभलगड येथे हलवली. प्रतापाने आपल्या सैन्यात वनवासी व भिल्ल लोकांचीही भरती केली. या लोकांनी आजवर कुठल्याही युद्धात भाग घेतलेला नव्हता. तरीपण राणा प्रतापने त्यांच्याकडून तयारी करवून घेतली. त्याचप्रमाणे सर्व रजपूत सरदारांना मेवाडचे स्वातंत्र्य अबाधित राखण्याकरिता रजपूतांच्या ध्वजाखाली एकत्र येण्याचे आवाहन केले.
राणा प्रतापचे २२ हजारचे सैन्य व अकबराचे २ लाखाचे सैन्य यांची हळदीघाट येथे समोरासमोर गाठ पडली. या युद्धात राणा प्रताप व त्याच्या सैन्याने खूप पराक्रम गाजवला. या युद्धात राणा प्रतापला माघार घ्यावी लागली, हे जरी खरे असले तरी अकबराचे सैन्य राणा प्रतापचा पूर्ण पाडाव करण्यात अयशस्वी ठरले. या युद्धात राणा प्रतापच्या बरोबरीने त्याचा प्रतापी, अत्यंत इमानी घोडा चेतकही अजरामर झाला. हळदीघाटच्या युद्धात चेतक खूप घायाळ झाला होता. तरीही त्याने आपल्या स्वामीचा जीव वाचवण्यासाठी स्वत:च्या जीवाची पर्वा न करता एका बर्‍याच मोठ्या नाल्यावरून लांब उडी मारली. नाला पार करताच चेतक खाली पडला व गतप्राण झाला. अशा प्रकारे त्याने स्वत:चे प्राण धोक्यात घालून राणा प्रतापला वाचवले. चेतकच्या मृत्युमुळे वज्रहृदयी पोलादी महाराणाही बालकाप्रमाणे अश्रुपात करू लागला. ज्या स्थानी चेतकने आपले प्राण सोडले त्या ठिकाणी राणा प्रतापने एक सुंदरसे उद्यान निर्माण केले. यानंतर स्वत: अकबराने राणा प्रतापवर हल्ला केला. ६ महिने युद्ध चालू ठेवूनही अकबर महाराणा प्रतापचा पराभव करू शकला नाही. हात हलवत अकबर दिल्लीला परतला. शेवटचा प्रयत्‍न म्हणून अकबराने सन १५८४ मध्ये महापराक्रमी सेनापति जगन्नाथ याला विशाल सैन्य देऊन मेवाडवर पाठवले. २ वर्षे अथक परिश्रम करूनही महाराणा प्रतापला पकडणे त्यालाही जमले नाही. पर्वताच्या दर्‍याखोर्‍यात लपत छपत फिरत असतांना महाराणा प्रताप स्वत:चे कुटुंबही बरोबर नेत असे. शत्रु केव्हाही पाठलाग करील अशी त्या सर्वांना धास्ती असायची. जंगलात खाण्यापिण्याचे अतिशय हाल होत असत. अनेकदा त्यांना भुकेपायी व्याकूळ व्हावे लागे. अन्नपाण्याशिवाय व झोपेशिवाय त्यांना रात्रीबेरात्री पहाडातून व जंगलातून भटकावे लागे. शत्रु आला, अशी खबर मिळताक्षणीच कित्येक वेळा समोरच्या पानातले अन्नपाणी सोडून निघून जावे लागे. अशा एकामागून एक आपत्ती त्यांच्यावर कोसळत होत्या. एक दिवस महाराणी जंगलात भाकर्‍या भाजत होती. सगळयांनी आपापल्या हिश्श्याची भाकरी खाऊन घेतली. महाराणीने आपल्या मुलीला अर्धी भाकरी खाऊन उरलेली रात्रीसाठी बांधून ठेवण्यास सांगितले. इतक्यात एका जंगली मांजरीने मुलीच्या हातातील भाकरी झडप घालून पळवली. असाहाय्यपणे ती राजकन्या रडत बसली. भाकरीचा अर्धा तुकडाही तिच्या नशिबात नव्हता. हे दृश्य पाहून वज्रहृदयी महाराणा प्रतापही किंचितसा विचलित झाला. त्याला आपल्या साहसाची, धैर्याची, पराक्रमाची व स्वाभिमानाची मनस्वी चीड आली. हे सगळे व्यर्थ आहे कि काय, असे वाटू लागले. विवश मनाच्या दोलायमान अवस्थेतच त्याने अकबराशी तह करण्यास संमति दिली. अकबराच्या दरबारातील महाराणा प्रतापचा चाहता असलेला राजकवि पृथ्वीराज याने महाराणा प्रतापला राजस्थानी भाषेत कवितेच्या रूपात एक मोठे पत्र लिहिले व धीर दिला व तहाच्या विचारापासून परावृत्त केले. कवी पृथ्वीराजच्या या पत्राने महाराणा प्रतापला आणखी दहा सहस्र सैनिकांचे बळ प्राप्‍त झाल्यासारखे वाटले. त्याचे विचलित झालेले मन स्थिर झाले. अकबराला शरण जाण्याचा विचार त्याने मनातून झटकून टाकला. उलटपक्षी त्याने अधिक तीव्रतेने व दृढतेने सैन्यबळ गोळा केले व आपले उद्दिष्ट साध्य करण्याच्या प्रयत्‍नांत तो मग्न झाला.
भामाशाह नामक रजपूत सरदार महाराणा प्रतापच्या पूर्वजांच्या दरबारात मंत्री म्हणून होता. आपल्या स्वामीवर जंगलात भटकण्याची आपत्ति यावी, याची त्याच्या मनाला सतत टोचणी लागली होती. महाराणा प्रतापला अशा आपद्‌ग्रस्त स्थितीत पाहून भामाशाहाचे मन द्रवले. त्याने २५ हजार सैनिकांना १२ वर्षांपर्यंत सहजतेने पदरी ठेवू शकेल एवढी अमाप संपत्ति आपल्या स्वामीच्या चरणी अर्पण केली. राणा प्रतापाचा आनंद गगनात मावेनासा झाला. कृतज्ञतेने त्याचे अंत:करण भरून आले. सुरुवातीला प्रतापाने भामाशाहाच्या संपत्तीला विनम्र नकार दिला. परंतु भामाशाहाच्या मन:पूर्वक आग्रहाखातर त्या संपत्तीचा अखेर त्याने स्वीकार केला. भामाशाहाच्या संपत्तीनंतर महाराणा प्रतापकडे इतर अनेक ठिकाणांहून धन यावयास लागले. या सर्व धनाचा उपयोग करून त्याने आपल्या सैन्यात वाढ केली व संपूर्ण मेवाड प्रांत स्वतंत्र केला. पण अजूनही चितोड मोगलांच्याच ताब्यात होते. मरणासन्न अवस्थेतही महाराणा प्रताप गवताच्या शय्येवरच होता. अंतिम क्षणापर्यंत तो मऊ, मुलायम गादीवर झोपलाच नाही. कारण चितोड स्वतंत्र करण्याची प्रतिज्ञा पूर्ण झाली नव्हती. अखेरच्या क्षणी आपला पुत्र अमरसिंहाचा हात हातात घेऊन त्याने आपली प्रतिज्ञा पूर्ण करण्याचे दायित्व त्याच्यावर सोपवले व शांतपणे आपले प्राण सोडले. अकबरासारख्या क्रूर बादशहाशी त्याने केलेल्या संघर्षाला इतिहासात तोड नाही. जवळजवळ संपूर्ण राजस्थान मोगल बादशहा अकबर याच्या ताब्यात गेले असतांना महाराणा प्रतापने आपला लहानसा भूप्रदेश बारा वर्षे लढवला. महाराणा प्रतापला नमवण्यासाठी बादशहाने पुष्कळ प्रयत्‍न केले; पण महाराणा प्रताप अखेरपर्यंत अजिंक्य राहिला. एवढेच नव्हे, तर त्याने मोगलांच्या तावडीतून राजस्थानचा बराचसा भूप्रदेश स्वतंत्रही केला. अपार कष्ट सोसून त्याने आपल्या कुळाला आणि देशाच्या प्रतिष्ठेला धक्का लागू दिला नाही. `स्वातंत्र्य' या शब्दाचा पर्यायच `महाराणा प्रतापसिंह' व्हावा इतके त्याचे जीवन तेजस्वी होते. त्याच्या वीरस्मृतीस आमचे अभिवादन !

" गाय एक उपयुक्त पशु !"



मुसलमान जेव्हा हिंदुस्थानवर चालून आले तेव्हा त्यांच्यातील कित्येक लुच्च्या सेनापतींनी मुसलमानी सैन्यापुढे गायींच्या कळपांचे गोल रचून चाल केली. हिंदूंचे सैन्य त्यांवर उलट चालून जाताच ते हिंदुसैन्य अकस्मात थांबले. मागे मागे हटू लागले ! का? हिंदूंचे हाती शस्त्रास्त्रे नव्हती? ते रणात काटाकाटी करण्यास भ्याले म्हणून? नव्हे ! तर ती शस्त्रास्त्रे
देशशत्रूच्या सैन्यावर सोडली तर प्रथम गायींचे पुढे असलेले कळपच मरतील म्हणून ! म्हणून हिंदू सैन्याने शस्त्रास्त्रे उपसण्यास साफ नाकारले ! गायी मरू नयेत म्हणून राष्ट्र मरू दिले !!!! गोवध हे महापाप. सोशिकपणा त्यांच्या हाडीमासी खिळलेला. पण देशशत्रुची नि धर्मशत्रुची आततायी चढाई रोखणे हेच महापुण्य, ही शिकवण त्यांस उत्कटत्वाने कोणी दिलेली नव्हती.
पंचगव्य हा संस्कृत शब्द आपणांस ब्रह्मज्ञान शब्दासारखाच पवित्र वाटतो
. मासेमाऱ्या कोळ्यांचे घरात माशांची दुर्गंधी सवयीने मुळीच येत नाही, पण इतरांस त्या आळीत पाय टाकताच नाक दाबून धरावे लागते. तसेच हिंदू तत्त्वज्ञानाने भारलेल्या त्या अमेरिकनादी प्रगत लोकांस हिंदू धर्माची दीक्षा देण्यासाठी गंभीरतेने बसवून आम्ही त्या दीक्षेचा पहिला विधी म्हणून जर त्यांस त्यांच्या डोळ्यांसमक्ष गायीची मुत्र नि शेण कालवून ते प्या म्हणून सांगितले, तर त्यांस आमच्या तर त्यास आमच्या धार्मिक हिंदू आचाराची इतकी किळस येईल की, शेण खाण्यानेच जो धर्म स्वीकारता येतो त्याचे तोंड देखील ते पाहू इच्छिणार नाहीत !!!!!!
खरोखर हा किळसवाणा प्रकार निदान परधर्मातील लोकांच्या हिंदुकरणाचे संस्कारांत तरी आढळता कामा नये. फार तर तुळशीपत्र खावे. शेण खाणे ही शिवी आहे, संस्कार नव्हे !!!
काहींचे म्हणणे असे की, 'गायीच्या शेणात नि गोमुत्रात तसेच काही रोगपरीहारक नि 'पौष्टिक' गुण आहेत !!!! म्हणून आमच्या त्रिकालज्ञानी स्मृतिकारांनी ते शेण खावे नि गोमुत्र प्यावे म्हणून सांगितले !' ज्या रोगांवर तो रामबाण उपाय ठरेल त्या रोगाचे वेळी ते खुशाल प्या. गोमुतात म्हणे औषधी गुण आहेत
! पण ते नाही कशात ? नास्तिमूलमनौषधम !! गोमुत्रात काही गुण आहेत तसे ते नृमूत्रातही आहेत ! बंदिगृहात जे अट्टल सोदे असतात त्यांना जेव्हा कळते की, आपणास फटक्यांची शिक्षा होणार तेव्हा ते आपल्या कोठडीत बंद असता पहाटेच स्वतःचे मूत्र गटगट पितात ! कारण, त्याचा गुण ते स्वानुभवाने सांगतात की, त्याच्या पिण्याने अंग बधीर होते नि फटक्यांच्या वेदना फार कमी होतात !!! म्हणून ते संस्कारांत प्यायचे काय? ब्र्यांडी कफ क्षयादी विकारावर औषध आहे, म्हणून तिचीही आचमने घ्यायची ?
अहो पण शिवाजी महाराजही स्वतःला 'गोब्राह्मणप्रतिपालक' म्हणवीत !
गो प्रतिपालन हे आमची एक राष्ट्रीय कर्त्यवच आहे. पण शत्रूकडील गायी मारणे पाप समजून, गाय ही अवध्य यासाठी हत्यार टाकून राष्ट्राचा घात करण्याइतकी महाराजांची गोभक्ती बोकाळती तर तीही राष्ट्रद्रोहच ठरती ! पण त्या महापुरुषाने पितृभक्ति देखील राष्ट्रभक्तीच्या खालीच गणली,
तिथे गोभक्तीचे काय ?
महाराज बैलगाडीत बसत म्हणून आज आगगाडीत बसावयाचे नाही की काय? महाराज कंबरेस भवानी लटकावीत, डोक्यास पोलादि शिरस्त्राण, हाती वाघनखे मग तुम्ही डोक्यात कानटोप्या नि हाती जपमाळा का धरल्या ? महाराजांच्या गोब्राह्मणप्रतिपालनाच्या ब्रीदाप्रमाणेच आणखी म्लेंच्छहननाच्या ब्रीदाविषयी या मंडळींत गोष्ट काढून बघा कसे थरकापतात !
गाय हा पशु उपयुक्त आहे म्हणून रक्षणीय आहे. गोरक्षणाचे धार्मिक स्वरूप सोडून, त्यास आर्थिक स्वरूप दिले कि झाले. हिंदूंच्या गोभक्तीत कृतज्ञता, दया, जीवैक्यबुद्धि इ. सदगुणांचा अतितेक आहे. पण गोघ्न अहिंदूंच्या गोहत्येत क्रुरपणा, कृतघ्नपणा आणि आसुरी जीवनहत्या इ. दुर्गुणांचा अतिरेक आहे तो धार्मिक खुळेपणाच नव्हे, पण अधार्मिक दुष्टपणाही आहे. ह्यास्तव त्या अहिंदूंनीही तो धार्मिक ’गोद्वेष’ सोडून देऊन आर्थिक द्रुष्टीचे गोरक्षण हेच कर्तव्य समजावे.
(समग्र सावरकर खंड ८ मधून साभार)
स्वा. सावरकर युवक संघटना , हिन्दुस्थान !!



लेखासाठी सहाय्य स्वाती सारंग !!

थोड़े आमचे विचार !!


खरच आपण ६ सोनेरी पाने वाचली पाहिजेत !
त्याचा अल्पसा आढावा आमच्या दृष्टी क्षेपातुन !!




सावरकरांचा `सहा सोनेरी पाने' हा ग्रंथ प्रत्येक हिंदूने वाचावा, असा आहे. गेल्या २ हजार ५०० वर्षांचा हिंदुस्थानचा इतिहास सावरकरांनी त्यात ग्रंथित केला आहे. हिंदुराष्ट्राची निर्मिती करू इच्छिणार्‍या सर्वांनीच एकदा तरी हा ग्रंथ वाचून काढावा. मुसलमानांची देशबाह्य निष्ठा, हा जगातील सर्व देशांचाच सध्या चिंतेचा विषय झाला आहे. १५ व्या शतकातही हा प्रश्‍न होता. `मुस्लिमांनी पादाक्रांत केलेला स्पेन निर्मुस्लिम कसा झाला ?' या उपशीर्षकाखाली या ग्रंथात सावरकर लिहितात, ``अनेक वर्षांच्या लढायांनंतर शेवटी इसवी सनाच्या पंधराव्या शतकात स्पॅनिश िख्र्त्यासंनी मुसलमानी राजसत्तेचा पुरा मोड करून टाकला; परंतु हिंदुस्थानाप्रमाणेच स्पेनमध्येही मुसलमानांच्या हातून जरी राजसत्ता छिनावली गेली होती, तरीही मुसलमानांनी बाटवलेल्या अगणित स्पॅनिश िख्र्त्यासंवर आणि त्यांच्या वसतीखाली असलेल्या भूक्षेत्रावर मुसलमानांनी जी इस्लामी धर्मसत्ता स्थापलेली होती ती तशीच अबाधित राहिली होती. इतकेच नव्हे, तर स्पॅनिश राष्ट्राला पुढे-मागे दुभंगून टाकण्यासही कारणीभूत होण्याइतकी ती स्फोटक नि भयावह होती. हे संकट ज्यांना डोळयांपुढे धडधडीत दिसत होते आणि मुसलमानांनी पूर्वी केलेल्या धार्मिक अत्याचारांचा संधी सापडताच सूड घेण्यासाठी जे नेहमीच टपलेले असत, त्या स्पॅनिश िख्र्त्यासंनी मुसलमानी राजसत्तेप्रमाणेच वरील मुसलमानी धर्मसत्तेलाही धुळीला मिळवण्याचा निर्धार केला.'' ``स्वतंत्र झालेल्या स्पेनच्या राज्यशासनाने एक निश्चित अवधी ठरवून दिला आणि सार्‍या राज्यभर घोषणा करवली की, या अवधीच्या आत झाडून सार्‍या मुसलमान स्त्री-पुरुषांनी एकतर आपण होऊन ख्रिस्ती धर्माचा स्वीकार केला पाहिजे, नाहीतर त्यांनी त्या अवधीमध्ये सहकुटुंब सहपरिवार देशाच्या बाहेर नित्याचे निघून गेले पाहिजे; पण जे कोणी मुसलमान त्या अवधीत ख्रिस्तीही होणार नाहीत किंवा देशही सोडणार नाहीत त्या सर्व मुसलमान स्त्री-पुरुषांचा एकजात शिरच्छेद करण्यात येईल !!'' सावरकर पुढे लिहितात ``काय म्हणता ? कोण घोर ही ख्रिस्ती राजाज्ञा ? होय ! पण हेही ध्यानात ठेवा की, स्पेनला जेव्हा मुसलमानांनी जिंकले तेव्हा त्यांनी याहूनही अघोर असे अत्याचार ख्रिस्ती जनतेवर तेथे बळाने धर्मांतर घडवून आणण्यासाठी केलेले होते. त्या वेळी ख्रिस्ती रक्‍ताचे पाट मार्गोमार्गी मुसलमानांनी वाहवले होते. आज मुसलमानी रक्‍ताचे पाट मार्गोमार्गी ख्रिस्ती वाहवणार होते. वर दिलेला अवधी संपताच स्पॅनिश िख्र्त्यासंनी ठिकठिकाणी उठाव करून स्पेनमध्ये उरलेल्या मुसलमानांचे, त्या इस्लामी स्त्री-पुरुषांचे, आबाल-वृद्धांचे सरसकट शिरकाण केले. मुसलमान रक्‍तात न्हाऊन स्पेनचे ख्रिस्ती चर्च `शुद्ध' झाले ! स्पेन निर्मुस्लिम झाले म्हणून स्पेन `स्पेन' राहिले ! त्याचे `मोरक्को' झाले नाही !''

केरळमधील सुप्रसिद्ध गुरुवायूर मंदिरात अहिंदूंना प्रवेश देण्यासाठी भाजप प्रयत्‍न करणार असल्याचे भाजपचे केरळ प्रदेशाध्यक्ष श्री. पी.के. कृष्णादास यांनी नुकतेच सांगितले आहे. भाजप अल्पसंख्यांकांच्या विशेषत: मुसलमानांच्या विरोधात आहे, ही भाजपची प्रतिमा पुसून टाकण्यासाठी सदर भूमिका भाजपतर्फे घेण्यात आली आहे, असे त्यांनी पुढे सांगितले. भाजपच्या या भूमिकेला रा.स्व. संघाचे प्रांत कार्यवाह श्री. के.आर्. मोहन यांचा पाठिंबा आहे. या पार्श्‍वभूमीवर सावरकरांची अहिंदूंना मंदिरात प्रवेश देण्यासंबंधीची मते आजही सर्वांना उद्बोधक आहेत. १९५८ साली पंढरपूर येथील विठ्ठल मंदिरात आचार्य विनोबा भावे यांनी अहिंदूंना सोबत घेऊन अट्टाहासाने प्रवेश केला. याबाबत सावरकरांनी त्याच वर्षीच्या `नवाकाळ'च्या दिवाळी अंकात `हिंदूंच्या देवळात अहिंदूंना प्रवेशाचा अधिकार नाही !', असा एक लेख लिहिला. ते लिहितात, ``या `जयजगत' मंडळींच्या या वेडपट मागणीस अनुसरून जर हिंदूंनी आपली मोठमोठी देवस्थाने अहिंदूंना, विशेषत: सर्व मुसलमानांना सताड उघडी करून दिली, तर तसा प्रवेशाचा अधिकार मिळताच जे शेकडो मुसलमान त्या हिंदु देवालयात शिरतील, ते मानव म्हणून नव्हेत, तर मुसलमान म्हणूनच शिरतील. त्या देवालयातील मूर्तीस हात जोडण्यासाठी नव्हे, तर तिला हातोड्याने फोडण्याची पहिली संधी केव्हा मिळते ते साधण्यासाठी ! हिंदूंच्या देवालयातील मूर्ती पहाताच मुसलमान समाज, आपले पहिले धर्मकर्तव्य कोणते समजतो, ते मुसलमानांनी हिंदूंपासून काही लपवून ठेवलेले नाही. आठवत नाही का, की जेव्हा मुसलमानांची सैन्ये प्रथमत:च पंजाब ओलांडून सौराष्ट्रापर्यंत भिडली, तेव्हा म्हणजे उण्यापुर्‍या एक सहस्र वर्षांपूर्वीच सुलतान महंमद गझनवी या इस्लामच्या सेनापतीने श्रीसोमनाथाची मूर्ती फोडताच शतकाशतकांच्या बोलघुमटातून प्रतिध्वनित जाईल इतक्या मोठ्याने राक्षसी गर्जना केली होती की, `मूर्तीपूजक म्हणून नव्हे तर मूर्तीध्वंसक-बुत्शिकन् असे म्हणवून घेण्यात मी धन्यता मानतो ! ही काफिरांची बुद्धप्रस्थी (मूर्तीपूजा) उखडून टाकण्याची प्रतिज्ञा करूनच मी या इस्लामी तख्तावर चढलो आहे !' त्या दिवसापासून तशाच पिसाळलेल्या प्रतिज्ञा करून सुलतानामागून सुलतान रामेश्‍वरपर्यंत युद्धाचा हलकल्लोळ माजवत गेले, हिंदूंच्या सहस्रावधी मूर्तींचे तोडून फोडून पीठ करून टाकले, देवस्थाने मातीत मिळवून दिली.'' सावरकर पुढे लिहितात, ``विनोबांच्या हट्टाग्रहाने पंढरपूरच्या हिंदूंनी अहिंदूंना विठ्ठल मंदिरात येऊ दिले. हे वृत्त ऐकताच मुसलमानांना मात्र तसा आग्रह करावयास कोणी विनोबा आला तर त्याची डाळ तेथे शिजायची नाही हे खडसावून सांगण्यासाठीच कि काय, त्याच आठवड्या-दोन आठवड्यांत कोल्हापूरच्या कित्येक मशिदींवर अशा लेखी सूचना फडकल्या की, `जे नमाज पढतात त्यांनाच काय तो मशिदीत प्रवेश मिळू शकतो !' ही मुसलमानी धमकी मात्र या `जयजगत्'वादी मंडळींनी अलगद गिळून टाकली. तोंडसुद्धा वाकडे केले नाही. इतकेच काय पण त्याच महिन्यात जेव्हा विनोबांना वाटेत असलेल्या एका दर्ग्यात जावेसे वाटले तेव्हा तेथील मुसलमान प्रमुखाने दटावले की, `या दर्ग्यात कोणी स्त्री येऊ शकत नाही. तुमच्या घोळक्यात आलेल्या या बायांना काढून टाका !' ती दटावणी होती मुसलमानांची ! अर्थात तिथे समतेचे वा मानवतावादाचे अवाक्षरही न काढता विनोबांनी त्यांच्या सहचारी मंडळीतील स्त्रियांना बाजूला काढले आणि दर्ग्यात जाऊन स्वत:स पावन करून घेतले ! अगदी आजही पाकिस्तानात सहस्रावधी हिंदू देवालयांचा केवढा भयंकर विध्वंस नि विटबंना होत आहे ! अर्थात जोवर मूर्तीभंजन हे इस्लामचे एक अपरिहार्य कर्तव्य होय. ही आमच्या मुसलमानांचीही अढळ निष्ठा आहे आणि त्या परस्परांच्या मनात धर्मशत्रुत्वाची सक्रीय भावना पेटलेली आहे तोवर गेल्या सहस्र वर्षांच्या वर उल्लेखलेल्या मुसलमानांच्या मूर्तीभंजक अत्याचारांची भयंकर आठवण विसरून हिंदूंनी आपल्या देवालयांतून त्याच मुसलमानांना मुक्‍तद्वार प्रवेशाचा, संचाराचा नि आचाराचा अधिकार द्यावा असे तुम्ही हिंदूंना कोणत्या तोंडाने सांगू शकता ?'' मुसलमान व ख्रिस्ती पंथियांनी हिंदूंच्या देवतांचा आणि मूर्तींचा त्यांना वाटणारा द्वेष कधीही लपवून ठेवलेला नाही. स्वा. सावरकरांचे हे विचार दुर्लक्षित केले, तर `हिंदूंच्या देवळात अहिंदूंना प्रवेश द्या !', अशी मागणी करायला हिंदू व त्यांची देवळेही शिल्लक रहाणार नाहीत !
( या लेखासाठी सहाय्य केल्या बद्दल स्वाती सारंग यांचे आभार )

Monday, June 21, 2010

स्वा. सावरकरांच्या कविता

ने मजसी ने परत ......
ने मजसी ने परत मातृभूमीलासागरा, प्राण तळमळलाभूमातेच्या चरणतला तुज धूतामी नित्य पाहिला होतामज वदलासी अन्य देशि चल जाऊसृष्टिची विविधता पाहूत‍इं जननीहृद्‌ विरहशंकितहि झालेपरि तुवां वचन तिज दिधलेमार्गज्ञ स्वये मीच पृष्ठि वाहीनत्वरित या परत आणीनविश्वसलो या तव वचनी मीजगद्‌नुभवयोगे बनुनी मीतव अधिक शक्ती उद्धरणी मीयेईन त्वरे, कथुनि सोडिले तिजलासागरा, प्राण तळमळलाशुक पंजरि वा हरिण शिरावा पाशीही फसगत झाली तैशीभूविरह कसा सतत साहु या पुढतीदशदिशा तमोमय होतीगुणसुमने मी वेचियली या भावेकी तिने सुगंधा घ्यावेजरि उद्धरणी, व्यय न तिच्या हो साचाहा व्यर्थ भार विद्येचाती आम्रवृक्षवत्सलता, रेनवकुसुमयुता त्या सुलता, रेतो बाल गुलाबहि आता, रेफुलबाग मला, हाय, पारखा झालासागरा, प्राण तळमळलानभि नक्षत्रे बहुत, एक परि प्यारामज भरतभूमिचा ताराप्रासाद इथे भव्य, परी मज भारीआईची झोपडी प्यारीतिजवीण नको राज्य, मज प्रिया साचावनवास तिच्या जरि वनिचाभुलविणे व्यर्थ हे आता, रेबहु जिवलग गमते चित्ता, रेतुज सरित्पते जी सरिता, रेत्वद्‍अविरहाची शपथ घालितो तुजलासागरा, प्राण तळमळलाया फेनमिषें हससि निर्दया कैसाका वचन भंगिसी ऐसा ?त्वत्स्वामित्वा सांप्रत जी मिरवीतेभिउनि का आंग्लभूमीतेमन्मातेला अबला म्हणुनि फसवीसीमज विवासनाते देशीतरि आंग्लभूमी भयभीता, रेअबला न माझि ही माता, रेकथिल हे अगस्तिस आता, रेजो आचमनी एक क्षणी तुज प्यालासागरा, प्राण तळमळलासावरकर १९०९ ब्राईटन समुद्र किनारा


हिंदु नृसिंह
हिंदु नृसिंहहे हिंदुशक्ति-संभूत-दीप्ततम-तेजाहे हिंदुतपस्या-पूत ईश्वरी ओजाहे हिंदु-सौभाग्य-भूतिच्या-साजाहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजाकरि हिंदुराष्ट्र हे तूंते। वंदनाकरि अंतःकरण तुज अभि-नंदनातव चरणिं भक्तिच्या चर्ची चंदनागूढाशा पुरवी त्या न कथूं शकतों ज्याहे हिंदुनृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।हा भग्न तट असे गडागडाचा आजीहा भग्न आज जयदु्र्गं आंसवांमाजी
ही भवानिची ह्या पुन्हा गंजली धाराती म्हणुनि भवानी दे न कुणा आधारागड कोट जंजिरे सारे । भंगलेजाहलीं राजधान्यांची । जंगलेंपरदास्य-पराभविं सारीं । मंगलेंया जगतिं जगू हीं आज गमतसें लज्जाहे हिंदु-नृसिंहा प्रभो शिवाजीराजाजी शुद्धि हृदाची रामदासशिर डुलवीजी बुध्दि पांच शाहींस शत्रुच्या झुलवीजी युक्ति कूटनीतींत खलांसी बुडवीजी शक्ति बलोन्मत्तास पदतलीं तुडवीती शुध्दि हेतुचि कर्मी । राहु देती बुध्दि भाबडया जीवां । लाहु देती शक्ती शोणितामाजी । वाहु देदे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे तुज ज्याहे हिंदु नृसिंहा प्रभो शिवाजीराजा ।




जयोस्त्तु तेजयोस्त्तु ते श्रीमहन्मंगले। शिवास्पदे शुभदे्स्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे ।।धृ।।राष्ट्राचे चैतन्य मूर्त तूं, नीति संपदांचीस्वतंत्रते भगवति। श्रीमती राज्ञी तू त्यांचीपरवशतेच्या नभांत तूंची आकाशी होशीस्वतंत्रते भगवती। चांदणी चमचम लखलखशी।।गालावरच्या कुसुमी किंवा कुसुमांच्या गालीस्वतंत्रते भगवती। तूच जी विलसतसे लालीतूं सुर्याचे तेज उदधिचे गांभीर्यहि तूंचीस्वतंत्रते भगवती। अन्यथा ग्रहण नष्ट तेंची ।।मोक्ष मुक्ति ही तुझीच रुपें तुलाच वेदांतीस्वतंत्रते भगवती। योगिजन परब्रम्ह वदतीजे जे उत्तम उदात्त उन्नत महन्मधुर तें तेंस्वतंत्रते भगवती। सर्व तव सहचारी होते ।।हे अधम रक्त रंजिते । सुजन-पुजिते । श्री स्वतंत्रतेतुजसाठिं मरण तें जननतुजविण जनन ते मरणतुज सकल चराचर शरणभरतभूमीला दृढालिंगना कधिं देशिल वरदेस्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।हिमालयाच्या हिमसौधाचा लोभ शंकरालाक्रिडा तेथे करण्याचा कां तुला वीट आलाहोय आरसा अप्सरसांना सरसे करण्यालासुधाधवल जान्हवीस्त्रोत तो कां गे त्वां त्यजिला ।।स्वतंत्रते । ह्या सुवर्णभूमीत कमती काय तुलाकोहिनूरचे पुष्प रोज घे ताजें वेणीलाही सकल-श्री-संयुता आमची माता भारती असतांकां तुवां ढकलुनी दिधलीपूर्वीची ममता सरलीपरक्यांची दासी झालीजीव तळमळे, कां तूं त्यजिले ऊत्तर ह्याचें देस्वतंत्रते भगवति। त्वामहं यशोयुतां वंदे।।


अनादि मी अनंत मी.....

अनादि मी अनंत मी, अवध्य मी भलामारिल रिपु जगतिं असा कवण जन्मला ।। धृ ।।अट्टाहास करित जईं धर्मधारणींमृत्युसीच गाठ घालु मी घुसे रणींअग्नि जाळि मजसी ना खड्ग छेदितोभिउनि मला भ्याड मृत्यु पळत सूटतोखुळा रिपू । तया स्वयें मृत्युच्याचि भीतिने भिववु मजसि ये ।। १ ।।लोटि हिंस्र सिंहाच्या पंजरी मलानम्र दाससम चाटिल तो पदांगुलाकल्लोळीं ज्वालांच्या फेकिशी जरीहटुनि भंवति रचिल शीत सुप्रभावलीआण तुझ्या तोफांना क्रूर सैंन्य तेंयंत्र तंत्र शस्र अस्र आग ओकतेहलाहल । त्रिनेत्र तोमी तुम्हांसि तैसाची गिळुनि जिरवितो ।। २ ।।




केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारलादुंदुभी निनादल्या, नौबती कडाडल्या, दशदिशा थरारल्या,केसरी गुहेसमीप मत्त हत्ती चालला, मत्त हत्ती चालला धृ.वाकुनी अदिलशहास कुर्निसात देवुनी,प्रलयकाल तो प्रचंड खान निघे तेथुनी ,हादरली धरणि व्योम शेषही शहारला १खान चालला पुढे, अफाट सैन्य मागुती,उंट, हत्ती, पालख्याही रांग लांब लांब ती !टोळधाड ही निघे स्वतंत्रता गिळायला २तुळजापुरची भवानी माय महान मंगला,राउळात आदमखान दैत्यासह पोचला,मूर्ती भंगली मनात चित्रगुप्त हासला 3श्रवणी तप्त तैल से शिवास वॄत पोहोचले,रक्त तापले मनात खडग सिध्द जाहले,देउनी बळी अदास तोशवी भवानीला ४सावधान हो शिवा !! वैर्याची रात्र ही !!काळ येतसे समीप, साध तूच वेळ ही,मर्दण्यास कालियास कृष्ण सज्ज जाहला ५केसरी गुहेसमीप, मत्त हत्ती मारला, मत्त हत्ती मारला


केवळ हिंदू !


अश्रूंत मी, हास्यात मी, दास्यात मी,वेदांत मी, सिद्धांत मी, विश्वरुपी , ब्रम्हांड मी,दैन्य मी, चैतन्य मी, सत्य मी, आभास मी,पूजा कधी, निर्माल्य मी, धन्य मी, मांगल्य मीमाझ्याच शॊधात मी.., माझ्याच शॊधात मी...हिंदू हिंदू केवळ हिंदू !
माझे अवघे मी पण हिंदूआयुष्याचा कणकण हिंदू,ह्रदयामधले स्पंदन हिंदूतन-मन हिंदू, जीवन हिंदू !दरीदरीतिल वारे हिंदूआकाशातिल तारे हिंदू,इथली जमीन, माती हिंदूसागर, सरिता गाती हिंदू !धगधगणारी मशाल हिंदूआकाशाहुन विशाल हिंदू,सागरापरी अफाट हिंदूहिमालयाहुन विराट हिंदू !तलवारीचे पाते हिंदूमाणुसकीचे नाते हिंदू,अन्यायावर प्रहार हिंदूमानवतेचा विचार हिंदू !महिला, बालक, जवान हिंदूखेड्यामधला किसान हिंदू,शहरांमधुनी फिरतो हिंदूनसानसांतुन झरतो हिंदू !प्रत्येकाची भाषा हिंदूजात, धर्म अभिलाषा हिंदूतुकाराम अन कबीर हिंदूहरेक मस्जिद, मंदिर हिंदू !इथला हरेक मानव हिंदूअवघी जनता अभिनव हिंदू,झंझावाती वादळ हिंदूहिंदू हिंदू केवळ हिंदू !शंभर कोटी ह्रदये हिंदू,हजार कोटी स्वप्ने हिंदू,असंख्य, अगणित ज्वलंत हिंदूअखंड भारत, अनंत हिंदू





आर्य बंधुनो उठा उठा कां मठासारखे नटा सदा ।हटा सोडनी कटा करुया म्लेंच्छ पटां ना धरु कदा ।।१।।काश्मीरच्या शाला सोडिनु अल्पाकाला कां भुलतां?।।मलमल त्यजूनि वलवल चित्ती हलहलके पट कां वरितां?।।२।।राजमंहेद्री चिटा त्यजुनि विटके चिट हे कां घेतां?।।दैवे मिळता वाटि, इच्छितो नरोटि नाही कां होता! ।।३।।येविल सोडिनु पितांबरांना विजार करिन्यांसाठि महा ।।बेजारचि तुम्ही नटावयामधि विचार करितो कोणि न हा ।।४।।केलि अनास्था तुम्हिच स्वत: मग अर्थातच ती कला बुडे गेले दिन हे नेले हिरूनी मेले तुम्हि तरि कोण रडे? ।।५।।अरे आपणच होतो पूर्वी सर्व कलांची खाण अहा ।।भरतभूमिच्या कुशीं दिप ते कलंक आतां आम्ही पहा ।।६।।जगभर भरुनी उरला होता नुरला आतां यापार ।।सकलहि कलाभिज्ञ तेघवां अज्ञ अतां अरिही थोर ।।७।।




सावरकर यांनी शिवाजी महाराजांन वर लिहिलेली
सावरकर यांनी शिवाजी महाराजांन वर लिहिलेली आणि एकमेव आसलेली आरतीआरती शिवाजी महाराजांचीजयदेव जयदेव जय जय शिवराया !या या अनन्य शरणा आर्यां ताराया !!धृ!!आर्यांच्या देशावरि म्लेंच्छांचा घालाआला आला सावध हो भूपाला
सद् गदिता भूमाता दे तुज हाकेलाकरुणारव भेदुनि तव ऱ्हिदय न कां गेला?.....१श्री जगदंबा जीस्तव शुंभादिक भक्षीदशमुख मर्दुनी जी श्रीरघुवर संरक्षीती पूता भूमाता म्लेंच्छाही छळतातुजविण शिवराया तिज कोण दुजा त्राता?.......२त्रस्त अम्हि दीन अम्हि शरण तुला आलोपरवशतेच्या पाशी मरणोन्मुख झालोसाधु परित्राणाया दुष्कृती नाशायाभगवन् भगवतगीता सार्थ कराया या..........३ऐकुनिया आर्यांचा धावा गहिवरलाकरुणोक्ते स्वर्गी श्री शिवनृप गहिवरलादेशास्तव शिवनेरी घेई देहालादेशास्तव रायगडी ठेवी देहालादेशस्वातंत्र्याचा दाता जो झालाबोला तत् श्रीमत्शिवनृप् की जय बोला..........४